HW News Marathi
महाराष्ट्र

दश-याच्या मुहूर्तावर नेत्यांचा ‘शिमगा’

पी.रामदास

मुंबई- दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज राज्यातील जनतेला विविध राजकीय पक्षाच्या नेत्याचे मेळावे पाहवयास मिळणार आहेत. मुंबईमध्ये परंपरेनुसार शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तिकडे भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा होणार आहे. त्या वंजारी बांधवांना संबोधित करणार आहेत. तर नागपूरमध्ये संघप्रमुखांनी परंरपरेनुसार शस्रपूजन करून देशाला मार्गदर्शन केले.

उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारमध्ये राहायचे की नाही, याबाबत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. भाजप सरकार शिवसेनेचा आवाज दाबवण्यासाठी नारायण राणेंचा अस्र म्हणून वापर करणार आहेत. त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या गोटाता नाराजीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची काय भूमिका असणार, याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरच राज्याच्या सत्तेचा अश्वमेध टिकणार की कोलमडणार हे स्पष्ट होणार आहे.

तिकडे पंकडा मुंडे यांना भगवानगडावर मेळावा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा भगवानगडाच्या पायथ्याशी होणार आहे. या मेळाव्यात वंजारी समाज मोठ्या संख्येने हजेरी लावून विचारांचे सोनं लुटतो. वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्या आहेत. त्या आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काही लोकलुभावण्या घोषणा करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीची सभा पाहिली असता पंकजा यांनी इतर ओबीसी नेते त्यांना पाठिंबा दर्शवण्याची शक्यता आहे. त्यातून एकप्रकारे सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या मंत्रिपदावर गंडातर येणार, असे बोलले जाते. परंतु या सभेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जाण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वंय संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे भाषण झाले. त्यांनी परंपरेप्रमाणे देशाला उद्देशून संबोधन केले. यावेळी त्यांनी हिंदूत्वाऐवजी स्वदेशीचा घोषा केला.एकूणच दसरा मेळाव्याला नेतेमंडळी विचारांचे सोने वाटणार की राजकीय पोळी भाजणार हे सायंकाळी स्पष्ट होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार, मंत्रिमंडळात घेतला निर्णय

Aprna

मराठा आरक्षणासाठी ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार ?

News Desk

….म्हणून राज्यात कधीही भाजपची सत्ता येऊ शकते!

News Desk