HW News Marathi
महाराष्ट्र

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांची खंत

मुंबई | अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (३१ मार्च) प्रदेश कार्यालयात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केली. मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याचा मुद्दा भाजपने उठवला असून यावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

कुणी कुठला मुद्दा घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार कुठलेही, असो सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय जे सांगेल त्याची अंमलबजावणी सरकारला करावी लागते आणि मुद्दा पटला नाही तर अपीलही करावे लागते. न्यायालयाने काय निर्णय दिला आहे. तो वाचला नाही मात्र त्याची माहिती घेऊन न्यायालयाचा अवमान होणार नाही असा निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

जातीय सलोखा राहण्याच्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनीही तीच भूमिका मांडण्याचे काम केले पाहिजे. यंदाच्या १५ ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज ७५ वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करते आणि आपण कुठल्या विषयांमध्ये जनतेला गुंतवून ठेवतोय आणि कुठल्या विषयाला महत्त्व देतोय याचे आत्मपरीक्षण… आत्मचिंतन झाले पाहिजे, असे सांगतानाच जनतेनेही या विषयाचा फार गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे वैयक्तिक मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पद्मावत’ चित्रपटाने बुडवलेला महसूल सरकाराने वसूल करावा

News Desk

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

News Desk

भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही!

News Desk