HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

पुणे | उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (२० मार्च) पत्रकार परिषदेत सर्व नागरिकांना गर्दी टाळावी असे सांगितले. तसेच लग्न समारंभ शक्य असल्यास पुढे ढकलण्यास सांगितले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी राज्याकडे पुरेसा पैसा आहे. यासाठी केंद्राला निधी मागण्याची आवश्यकता नाही, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य त्यासाठी सक्षम आहे. केंद्र सरकार कोरोनाबाबत महाराष्ट्राशी संपर्कात आहे. पंतप्रधान, केंद्रीय आरोग्यमंत्री सगळे एकमेकांना संपर्क करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसच्या या संकटाविरोधात राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करत आहेत. यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे. जिथे आवश्यक आहे तिथे सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल. मुंबईच नव्हे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. तसेच, नागरिकांनी जर गर्दी कमी केली नाही तर बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही पवार म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत सांगितलेल्या बाबी या त्या तारखेपर्यंत पाळायच्या आहेत आणि त्यात काही बदल झाले तर तशी माहिती आम्ही कळवू अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

राणेंचं मनस्वास्थ बिघडलंय संजय राऊतांचे हल्ले सुरूच!

News Desk

मंत्री जयंत पाटील म्हणाले ‘हा माझ्यासाठी भावूक क्षण…’

News Desk