HW News Marathi
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (६जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याला १०० कोटींची मदत केली त्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे.

‘निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल’ असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. “या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे” अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीवर बोलताना सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे कौतुक देखील केले. “मोदी सरकारने कठोर निर्णय घेतले. जे निर्णय आपण पाहू शकणार नाही असे अनेकांना वाटत होते, ते निर्णय मोदी सरकारने घेतले. यात कलम ३७० रद्द करणे हा महत्वाचा निर्णय होता” असेही त्यांनी म्हटले. “३७० रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे बोलले जायचे. पण असे काही घडले नाही उलट काश्मीरच्या विकासाची प्रकिया सुरु झाली” असे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी विधेयकाबाबत काढलेल्या अधिसुचनेला राज्यात स्थगिती!

News Desk

“सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावं”, भाजपची टीका!

News Desk

राहुल गांधी, प्रशांत किशोरांचा रवांडाच्या सरकारने फोन टॅप केल्याचा नितीन राऊतांचा आरोप!

News Desk