HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी संजय राऊतांना दिली नारदाची उपमा ! ‘एक नारद सर्व गारद’

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राजकारण वेगळ्यापद्धतीने अनुभवायला मिळाले. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र, अधूनमधून या या सरकारमध्ये काही वाद निर्माण होताना पाहायला मिळाले. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.

संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. येत्या शनिवार पासून ३ भागांत ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी ट्विटर वरून या मुलाखतीचा टिझर समोर आणला असून या मुलाखतीला ‘एक शरद…सगळे गारद’! असे नाव दिले आहे. त्यामुळे या मुलाखातीकडे संपूर्ण देशातील राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.

पवारांच्या त्या मुलाखतीला संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ‘सामना’ हे आता शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पाण्याचे दर वाढवल्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न –अजित पवार

swarit

रत्नागिरीत १९ पैकी १४ जण कोरोना निगेटिव्ह तर ५ जण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह

swarit

“महाराष्ट्रात दिवाळीनंतर भाजपचं सरकार येईल”, सुजय विखे पाटलांचं विधान

News Desk