HW News Marathi
महाराष्ट्र

पहिल्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता – देवेंद्र फडणवीस

मुंबई | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तो सोपवला आहे. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आलं त्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून रहायला नको होतं. राजीनामा दिला खरं पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

हा उशिरा आलेला राजीनामा

खरं म्हणजे पहिल्याच दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

त्या पोलिसांवर कारवाई का नाही?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला २० दिवस होऊन गेले तरी देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. या प्रकरणात सर्व पुरावे असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्या पोलिसांवर कारवाई झालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी हा विषया लावून धरला त्यामुळे राजीनामा दिला गेला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल म्हणून हे झाले. राजीनामा झाला, आता एफआयआर करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“तो आवाज माझ्या मुलाचा नाही!”,अरूण राठोडच्या आईचा खुलासा…

News Desk

अंगरक्षक गोविंदाच्या निधनाने भावूक झालेल्या पंकजा मुंडेंची पोस्ट !

News Desk

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk