HW News Marathi
Covid-19

फडणवीस म्हणतात, ‘याच’ कारणामुळे आमच्या काळात वीजबिल थकबाकी असेल !

मुंबई । कोरोना काळात सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीजबिलासंदर्भात दिलासा दिला जाणार नसल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांना काहीच दिवसांपूर्वी सांगितले. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधक ठाकरे सरकारविरोधात प्रचंड आक्रमक झालेले असताना आता ठाकरे सरकारने भाजपला दणका दिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात ३६ हजार कोटींहून अधिक थकबाकी असल्याचे सांगत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारच्या या निर्णयाविषयी बोलताना म्हणाले की, “आमच्या सरकारच्या काळात ऊर्जा विभागाने उत्तम काम केले आहे. त्यामुळे, आमच्या काळात थकबाकी असेल तर त्याचा अर्थ आम्ही गरीबांना सवलत दिली आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वीज बिलावरुन या सरकारने घुमजाव केला असून हा मुद्दा आम्ही निवडणुकीत मांडणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, ठाकरे सरकारचा हा निर्णय म्हणजे भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाप्रमाणे ‘हे’ देखील संकट थोपवून मागे परतवू !

News Desk

आपल्याच लोकांना राज्यात घ्यायला त्यांचा विरोध आहे, मजुरांचे दु:ख विचारणार्‍यांचा द्वेष | सामना

News Desk

#Coronavirus : राज्यात १४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले 

News Desk