HW News Marathi
महाराष्ट्र

चर्चा करायची नसेल तर आम्ही घरी जातो…फडणवीसांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

मुंबई | विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात अनेक विषयांवरून आरोपी प्रत्यारोप झाले.दरम्यान, विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. तसंच अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृगहात गोंधळ घातला होता. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सरकारवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

“जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसंच ३ वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. शिवसेनेचे आमदार एकामागून एक विषय काढत आहेत. मग आता चर्चा ५ वाजता करा. करोना, शेतकऱ्यांचे असे महत्त्वाचे विषय असताना असं कसं चालेल? त्यामुळे ३ वाजल्यानंतर चर्चा केली पाहिजे. आता आपण ही चर्चा केली तर ३ वाजता मंत्र्यांच्या उत्तरासह ही चर्चा संपवावी लागणार आहे,” असं फडणवीस म्हणाले. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, पूरग्रस्तांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

१० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या करोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो.जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिलं जातं आहे. असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात बोलताना केला. राज्य सरकार करोनाबाबत गंभीर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिलं आकारली जात आहेत असाही आरोप त्यांनी केला. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्याची अमलबजावणी होत नाहीत. गरीब रुग्णांनी काय करायचं असा संतप्त सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये करोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात आम्हाला टीका करण्याची हौस नाही मात्र सरकार काय करतं आहे ते दिसतच नाही त्यामुळे बोलावं लागतं आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Belgaum Bypoll Result : बेळगाव पोटनिवडणूकीत भाजप जागा राखणार, की शुभम शेळके बाजी मारणार?

News Desk

भाजपच्या ‘या’ विद्यमान आमदारांचा पत्ता कट ?

News Desk

डबेवाल्यांना लोकल प्रवास करताना QR कोड घेणे बंधनकारक

News Desk