HW News Marathi
महाराष्ट्र

“खरंतर ‘तो’ रिपोर्ट नवाब मलिक यांनीच फोडला”, फडणवीसांचे मोठे वक्तव्य

मुंबई | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. आता या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (२७ मार्च) माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, फोन टॅपिंगचा रिपोर्ट नवाब मलिका यांनीच फोडला असल्याचंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं.

“महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मला माहिती आहे नवाब मलिक का चिंतेत आहेत?, कारण त्यांना हे माहिती आहे की, फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं की, महाराष्ट्र पोलिसांची बदनामाी करण्याचा जो काही प्रकार आहे. त्यामध्ये खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनीच फोडला”.

“मी पहिली दोन पानंच दिली होती. पण मी हा सवाल विचारू इच्छितो, की सिंडिकेट राज चालवल्याने, बदल्यांमध्ये पैसे खालल्याने, दलाली केल्याने आणि वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाली की महाराष्ट्र पोलिसांचं नावं झालं? आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे सगळे वाझेचे मालक आहेत, ते आज चिंतेत आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचं केवळ कव्हरिंग लेटर वाचलं होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.”

‘रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान’

देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो ६ जीबीचा डेटा दाखवावा, असं आव्हानच मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचं काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, पण तसं काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्वास आहे, असा दावाही मलिकांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘त्रिसूत्री’ कार्यक्रम

News Desk

“भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?”, फडणीसांना पटोले यांचा उलट प्रश्न

News Desk

फडणवीस सरकारमुळे राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज | पवार

News Desk