HW News Marathi
महाराष्ट्र

मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो – एकनाथ खडसे

जळगाव | “माझ्याविरुद्ध जे षडयंत्र रचले, ते देवेंद्र फडणीस यांनी, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो” असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन आज (१० सप्टेंबर) मुक्ताईनगरमध्ये झाले तेव्हा ते बोलत होते.

गेले अनेक दिवस आपल्याच पक्षाला घरचा आहेर देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल यावेळी खडसे यांनी केला असून, लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’” पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

“लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार असून त्यातून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं खडसे म्हणाले. खडसे म्हणाले, दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. यावेळच्या वाढदिवस सुनील नेवे यांच्या पुस्तका मुळे लक्षात राहील, मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे”, असं खडसे म्हणाले.

“भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचं म्हटलं. मग मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न मला आहे. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, असं खडसे म्हणाले. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ यांची भूमिका होती”, असं ते म्हणाले.

“पक्षात आरोप झालेल्या सगळ्यांना क्लिन चिट मात्र मला दिली नाही. मला सर्वच पक्षाच्या ऑफर आहेत. मी महाराष्ट्रातील जनतेला विचारणार आहे,की मी पुढे काय करावं. मी पक्षाच्या विरोधात कधी बोललो नाही. फक्त देवेंद्र फडणवीस यांचा त्रास झाला म्हणून त्यांचं नाव मी घेतो. सरकार आलं असतं पण यांच्यामुळे आलं नाही. मला अस बोलू नका म्हणतात, पण चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्याची धमक ज्यांच्यात असते तेच स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. एकटं पडण्याची भीती गुलामांना असते”, असं खडसे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

News Desk

एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

News Desk

नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक

News Desk