HW News Marathi
महाराष्ट्र

विजयाबद्दल विश्वास नाही म्हणुन पंकजांची निवडणूकीतून माघार ,धनंजय मुंडेंचा टोला!

बीड | बीड येथील डीसीसी बँकेची निवडणुक आज (२० मार्च) होणार आहे. थेट पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे हा सामना रंगणार असताना पंकजांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला होता. डीसीसी बँक निवडणूक रिंगणातून मतदानाच्या काही तासांपूर्वीच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी माघार घेतली होती. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत मुंडेंनी काल (१९ मार्च) ही घोषणा केली होती.

या त्यांच्या घोषणेवर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मांडली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

“विरोधी पक्षाने मतदानाच्या काही तासाअगोदर माघार घेतली आहे. मतदारांवरच माजी मंत्र्यांचा विश्वास राहिला नाही. कोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नाही. लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या ६ जागा लढवत असून सर्वची सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी होणार”, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

“कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी”, असे आवाहन मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आज (२० मार्च) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान शांततेत, नियमाप्रमाणे पार पाडावे, असे आवाहन धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक प्रमुख नेत्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे – उद्धव ठाकरे

News Desk

“पवारसाहेब तुम्ही दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं, शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना”, भाजपची मागणी

News Desk

मराठा समाजाला नाराजी व्यक्त करण्याची मुभा द्यावी, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk