HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका

बीड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचा जास्त परिणाम हा महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांना भोगावा लागला आहे. कोल्हापूरातील शिरोळ येथे झालेल्या अवकाळी पावसामूळे या कामगारांची घरे गेली, त्यांच्या अन्नात चिखल पडायला लागल्याने बीडच्या माजी पालकमींत्री पंकजा मुंडेंही आज आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, बीडचे आत्ताचे पालकमंत्री धनंजय मुंडे या ऊसतोड कामगारांसाठी काय पाऊल उचलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

या ऊसतोड कामगारांसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या ऊसतोड मजुरांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली, असे ट्विटही त्यांनी केले आहे.

तसेच, अधिक नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांना त्वरित शिरोळ येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्थलांतरित केले असून त्यांना जीवनावश्यक वस्तू, किराणा आदीही पुरवण्यात आली आहे. ऊसतोड मजुरांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर शुगर कमिशनर, जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार यांच्याशी धनंजय मुंडे संपर्कातही आहेत. दरम्यान, ऊसतोड कामगारांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरी म्हणाले…..पुढील ३ वर्षात!

News Desk

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, दरेकरांचा आघाडी सरकारवर निशाणा

News Desk

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!’, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

News Desk