HW News Marathi
महाराष्ट्र

“कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही” – धवलसिंह मोहिते पाटील

मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी अखेरआता काँग्रेसचा हात धरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज (२८ जानेवारी) त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

यावेळी बोलताना धवलसिंह म्हणाले की, “मी ८-९ वर्षांचा असताना आम्ही आईस्क्रीम विकून अकलूजमधली पहिली रुग्णवाहिका सुरु केली. आमच्यावर जनसेवेचे संस्कार आहेत. कॉंग्रेस पक्ष आणि मोहिते पाटील यांचे नाते फार जुने आहे”. पुढे ते असंही म्हणाले की, “कॉंग्रेस कोणीही संपवू शकत नाही. विचारधारा आणि तत्त्वांशी बांधिलकी यामुळे काँग्रेसची भक्कमपणे वाटचाल अजूनही सुरु आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांनी दिली ती तात्पूरची वाट होती म्हणून कॉंग्रेसच्या मुळाशी आलो. आणि खरी वाढ ही मुळापासूनच होते”, असं म्हणत पवारांना टोलाही त्यांनी लगावला.

प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र म्हणजे धवलसिंह मोहिते पाटील. वडलांबद्दल बोलताना धवलसिंह म्हणाले की, “माझ्या वडलांवर प्रेम करणारी जनता माझी संपत्ती आहे. आज माझ्यासह ६२५ जणांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, आयुष्यात २ जण खूप महत्त्वाची असतात, एक जो नाव देतो आणि दुसरा जो संधी देतो.  प्रतापसिंहांनी आम्हाला नाव दिलं, आज काँग्रेस प्रवेश करत आहे नक्कीच पुढे चांगली संधी मिळेल याची खात्री आहे”, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा! – रामनाथ कोविंद

Aprna

‘माकडवस्थेत’ जाऊन झाडावरची पानं – फुलं खाऊन जगावं की काय? रुपाली चाकणकरांचा सवाल

News Desk

आता रामदास आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल

News Desk