HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोना’मुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय दृष्ट्या मोठे संकट ?

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातसाठी देशात लॉकाडाऊनची घोषणा करण्यात आली असून आजचा (३ एप्रिल) ९वा दिवस आहे. कोरोनाबरोबर महाविकासआघाडीचे नेतृत्व करणारे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय संकटाचा देखील सामना करावा लागणार आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असून हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्या सरकारने सध्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. कारण उद्धव ठाकरेंना सहामहिन्याचा कालावधीत विधिमंडळाचे सदस्य होण्याचे मोठे आवाहन आहे.

याआधीच कोरोनामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील नवीमुंबई महानगर पालिका आणि औरंगबाद पालिका निवडणुका रद्द केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे. येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खा. अशोक चव्हाण

News Desk

‘HSC’ निकालाचं काम करण्यास मुदतवाढ द्या, शिक्षक संघटनांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी!

News Desk

राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची अडचण वाटत असेल म्हणून…राज्यपालांच्या सल्ल्यावर शिवसेनेचे उत्तर

News Desk