HW News Marathi
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मुंबई | दिव्या फाऊंडेशन बुलडाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याचं कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला. झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली.

अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडं ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे असे खिळेमुक्त झाडं मोहिमेचे मुंबईचे समन्वयक तुषार वारंग यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्हीं प्रयत्न करत आहोत आणि यापुढें महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात आणि शहरांत खिळेमुक्त झाडं त्याचबरोबर बॅनर, पोस्टरमुक्त झाडं आणि आळेयुक्त झाडं मोहीम विस्तारण्याचा आमचा मानस आहे असे यावेळीं खिळेमुक्त झाडं मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील यांनी सांगितले. माधव पाटील, प्रमोद शेवाळे, राजेश राऊत आणि तेजश्री देवडकर यांनी अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार मा. दत्ता बारगजे आणि रेखाताई बारगजे यांच्या हस्ते स्वीकारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Aprna

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची राऊतांची मागणी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला दिले उत्तर 

News Desk

महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करण्याचे नागरिकांना महापौरांकडून आवाहन

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk

Aprna

Chetan Kirdat