HW News Marathi
देश / विदेश

भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांनो छत्रपतींची बदनामी तुम्हांला मान्य ? राऊतांचा सवाल ..

मुंबई | भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशनही केले.

या पुस्तकाच्या प्रकाशानंतर भाजपवर संपुर्ण महाराष्ट्रातून टिकेची झोड उठली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पाठोपाठ चार ट्विट करत भाजपवर टीका केली. त्याचपद्धतीने त्यांनी छत्रपतींच्या वंशंजांना लक्ष केले आहे . त्याचबरोबर त्यांनी छत्रपतींच्या गादीचा वारसा सांगणाऱ्यांना हे मान्य आहे का? अशी विचारणाही केली आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की असा खोडसाळपणा छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का असा प्रश्न विचारून भाजपवासी झालेल्या उदयन राजेंना जणू यावर खुलासा करायला हवा असे सुचवले. त्यानंतर ‘सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला.. काहीतरी बोला..’ असे तिसरे ट्विट करत त्यांनी थेट वंशजांची नावेच घेत यावर प्रतिक्रिया देण्याच आवाहन केले.संजय राऊतांच्या ट्विट्सची ही संपुर्ण मालिका ..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

News Desk

बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४० जणांची स्टार प्रचारक यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर… 

News Desk

चिनी दूरसंचार उपकरणांच्या वापरावर तात्काळ बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk