HW News Marathi
महाराष्ट्र

पिण्याच्या पाण्यावरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब

मुंबई | राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण १०० टक्के भरले असतानाही नियोजन झालेले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा हा सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. “खडकवासला, टेमघर या धरणातही पाणी कमी आहे. त्यामुळे या परिसराला पाणी मिळत नाही. याला जबाबदार कोण आहे ?”, असा सवाल करत त्यांच्या चौकशीची तसेच कारवाईची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (१७ जून) सुरुवात झाली आहे. आज (२० जून) या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी सभागृहात अजित पवार, आमदार राजेश टोपे, आमदार प्रणिती शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. उजनीचे पाणी सोलापूरला मिळत नाही, असा प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यावर, राज्यात योग्य प्रमाणात पाणी पुरवठा केला जात असल्याचे गिरीश महाजन यांनी दिले आहे. राज्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

शेवटी सभागृहात निर्माण झालेला गदारोळ लक्षात घेत अर्थमंत्री व राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचन प्रकल्पांना निधी वितरित करण्यात आला आहे. “अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देऊ. उजनी १०० % भरले होते हे खरे आहे. कालवा सल्लागार समितीने नियोजन करूनच पाणी सोडले आहे. शेतकरी खूश आहेत. आम्ही त्यांना मुबलक पाणी देत आहोत. ढिसाळ नियोजन आहे हा आरोप चुकीचा आहे”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोंबडी चोर !!!”, नारायण राणेंविरोधात पोस्टरबाजी

News Desk

आता नवा वसुली मंत्री कोण? – चित्रा वाघ

News Desk

राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत, राऊतांची धनंजय मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया 

News Desk