HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला !

मुंबई। निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला. या पार्श्वभूमीवर मी सर्वप्रथम रायगड जिल्ह्याचा पहिला दौरा केला आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले, असा दावा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरेकर पुढे म्हणाले, “माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला,” असेही ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा,श्रीवर्धन,हरेश्वर,बोर्ली पंचतन,दिवेआगर सह संपूर्ण कोकणाचे मोठे नुकसान झाले असून २५ कोटी आणि १०० कोटी अश्या तुटपुंज्या मदतीवर जिल्ह्यातील लोकांचे भागणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मदतीवर टीका केली. सरकारने केलेली मदत कोकणाच्या जनतेची थट्टा करून जनतेची फसवणूक करून कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे धंदे सोडून द्यावेत,” असे दरेकर यावेळी म्हणाले.

दरेकर ऐवढेच नाही बोले तर त्यांनी सरकारला उद्देशून म्हणाले, “कोकणाच्या जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे, अगदी ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राज्याचीही सत्ता तुम्हाला दिली असून शासनाने हात आखडता न घेता कोकणाला भरभरून मदत द्यावी.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाचा मुंबईत एल्गार !

News Desk

आता राज्यातील गोरगरिबांना १० रुपयांत मिळणार भोजन

News Desk

“शिवसेनेत असताना गडकरींना माहित न्हवतं का?”, नाना पटोलेंचा गडकरींना सवाल

News Desk