HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळे वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला

पालघर | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील रस्त्यांवरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. लॉकडाऊनमुळे पालघरमधील चिंचारे येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र, रुग्णालयातून दुचाकीवरुन घरी जाताना त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे कोणतेही वाहन न मिळाल्याने त्या व्यक्तीच्या दोन्ही मुलांनी दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला.

मृत व्यक्तीचे नाव लडका वावरे असे असून ते मूळचे चिंचारे येथील येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्याचे सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना काल (२७ मार्च) डिस्चार्ज दिला. मात्र, घरी जात असताना अर्ध्या रस्त्यात दुचाकीवरच अचानक त्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊमुळे वाहतूक ठप्प असल्यामुळे त्यांना कोणतेही वाहन मिळाले नाही. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानेमुळे दोन्ही मुलांनी दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला. मात्र, मृत व्यक्तींच्या कुटुंबियांने कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने लडका वावरे यांचा आरोप केला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आटपाडी डेपोला कुलुप, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर गोपीचंद पडळकर आक्रमक!

News Desk

राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनकडून दत्तक घेऊन सुद्धा झाला नाही

News Desk

फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल!

News Desk