HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : “हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं षडयंत्र, माझ्याकडे सगळे पुरावे”; रवी राणांचा गंभीर आरोप

मुंबई |  मी दिल्लीमध्ये असताना सुद्धा माझ्यावर शाईफेक प्रकरणी ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल केला. आणि गुन्हा दाखल करून मला ज्या पद्धतीने पोलिसांनी अटक करण्याचे षडयंत्र केले आहे. तसेच महाविकासआघाडीचे सरकार हे दडपशाहीचे सरकार आहे,” असा आरोप आमदार रवी राणा यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. रवी राणा यांनी एच. डब्ल्यू.मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. 

रवी राणा म्हणाले, “शाईफेक प्रकरणाशी माझा काढीचाही संबंध नाही, आणि मी प्रकरणाचा निषेध केला आहे. मी दिल्लीमध्ये असताना सुद्धा माझ्यावर शाईफेक प्रकरणी ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल केला. आणि गुन्हा दाखल करून मला ज्या पद्धतीने पोलिसांनी अटक करण्याचे षडयंत्र केले आहे. मी या अधिवेशनामध्ये येवू नये, लोकांचे प्रश्न मांडू नये. अशा प्रकारचा सरकारचा दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला असे वाटते मी या विधीमंडळाचा सदस्य आहे. जर मला न्याय मिळत नसेल. तर मी लोकांसाठी न्याय काय मागणार आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी ८ दिवसात तपास करून न्याय देण्यास सांगितले आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशी करायला सांगितले आहे. त्या चौकशीत जो दोषी राहिल त्यावर कारवाई होईल,” असे आश्वासन दिल्याचे त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. 

रवी राणा एच. डब्ल्यू. मराठी बोलताना काय म्हणाले

रवी राणा म्हणाले, “शाईफेक प्रकरणाशी माझा काढीचाही संबंध नाही, आणि मी प्रकरणाचा निषेध केला आहे. पण, मी दिल्लीमध्ये असताना माझ्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल केला. आणि गुन्हा दाखल करून मला ज्या पद्धतीने पोलिसांनी अटक करण्याचे षडयंत्र केले. या अधिवेशनामध्ये येवू नये, लोकांचे प्रश्न मांडू नये. अशा प्रकारचा सरकारचा दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल केला. मला असे वाटते मी या विधीमंडळाचा सदस्य आहे. जर मला न्याय मिळत नसेल. तर मी लोकांसाठी न्याय काय मागणार आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी ८ दिवसात तपास करून न्याय देण्यास सांगितले आहे. वरिष्ठ पातळीवर चौकशी करायला सांगितले आहे. त्या चौकशीत जो दोषी राहिल त्यावर कारवाई होईल. पण अशा प्रकारचे सरकार दडप शाहीचे राजकारण करत असेल. तर याठिकाणी मला सीबीआय आणि ईडीकडे जावे लागेल. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर थेट टिका केली, या प्रकरणाचे तुमच्याकडे पुरावे आहे, असा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी विचारले आहे. त्यावर बोलताना रवी राणा म्हणाले, माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. जर मला राज्य सरकारकडून न्याय नाही मिळाला तर मी सीबीआय आणि ईडीकडे पुरावे देईन.” 

संबंधित व्हिडिओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’ जयंत पाटलांचा मोदींना टोला!

News Desk

शरद पवारांच्या हत्येचा कट, पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Aprna