HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीने व्यक्त केली ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता

मुंबई | राज्यातील १४ वी विधानसभा निवडणूक २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान होणार आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पूर्णपणे सुरक्षित असल्याचा आणि हॅक होण्याची वर्तवली जात आहे. यामुळे मतदान केंद्र आणि स्ट्रॉगरूमपासून तीन किमी परिसरातील इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी आज (२० ऑक्टोबर) निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठविले आहे. यात या पत्रात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होऊन इच्छा नसलेल्या उमेदवारांनाच मते जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने आयोगाला पाठविलेल्या पत्रात नेमके काय म्हटले

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणे मोबाइल किंवा इंटरनेटद्वारे हॅक होण्याच्या शक्यतेबद्दल असलेले सार्वत्रिक संशयाचे वातावरण लक्षात घेता उद्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ तसेच जिथे ही उपकरणं ठेवली जातात अशा प्रत्येक स्ट्रॉन्ग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदवली आहे. इतर राज्यांमध्ये निवडणुकी दरम्यान अशा प्रकारे इंटरनेट सेवा खंडित करून खबरदारी घेतली गेल्याचे निरीक्षण आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षण विभागाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Aprna

लातूरमध्ये परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

News Desk

“महाराष्ट्राची अवस्था आई नीट जेवू देईन अन् बाप भीक मागू देईना”, अशी झाली आहे, महापौरांनी केंद्राला सुनावले

News Desk