HW News Marathi
महाराष्ट्र

आधार कार्ड पडताळणीसाठी आता चेहऱ्याचा आधार

नवी दिल्ली – आधार कार्डच्या बायोमॅट्रिक पडताळणी करताना बोटांचे ठसे अनेकदा मॅच होत नाही. वयोमाननुसार हाताच्या बोटांवरील रेषा अस्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणीं येत होत्या. या सर्व तोडगा म्हणून आधार कार्डच्या पडताळणी करण्यासाठी आता नागरिकांचा चेहरा देखील ग्राह्या धरला जाणार आहे.

ज्या व्यक्तींना बयोमॅट्रिक पडताळणीत अडचणी येत होत्या. १ जुलै २०१८ पासून अश्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरुन नोंदणी आधार कार्ड ग्राह्य होणार असल्याचे युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टात मंगळवारी आधार कार्ड सुनावणी होण्यापुर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत ११७ कोटी नागरिकांना आधार कार्ड बनविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील स्थितीबाबत पवारांना चिंता, सरकार लवकर स्थापन व्हावे !

News Desk

अविनाश जाधवांना मलंगगडावर आरती करण्यापूर्वीच केली अटक, तरीही २७ एप्रिलला आरतीचा निर्धार

News Desk

आता शरद पवार अन् अजित पवार येतील कि काय ?

News Desk
महाराष्ट्र

मराठवाड्यात राष्ट्रवादीची उद्यापासून हल्लाबोल यात्रा

swarit

बीड नाकर्त्या भाजप-शिवसेना सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुळजापूरच्या आई भवानीचा आशिर्वाद घेऊन उदयापासून मराठवाडयामध्ये हल्लाबोल यात्रा सुरु होत असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यात्रेला रवाना होण्यापूर्वी परळीत पत्रकारांना दिली .

विदर्भामध्ये १५५ किलोमीटरची यवतमाळ ते नागपूर अशी सरकारविरोधी हल्लाबोल पदयात्रा काढल्यानंतर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाडयावर लक्ष केंद्रीत करत इथल्या समस्या सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेल्या सरकारच्याविरोधात हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे. त्याची पूर्वतयारी मराठवाडयातील नेते आणि पदाधिकारी मोठया जोमाने करताना दिसत आहेत.

मंगळवारी १६ जानेवारीला सकाळी तुळजापूरच्या आई भवानीला साकडं घालून या हल्लाबोल यात्रेची सुरुवात होणार आहे. सकाळी या हल्लाबोल यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा सौ चित्राताई वाघ, आमदार राणा जगजितसिंग आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर भव्य सभा होणार आहे. या सभेला न भूतो न भविष्यती अशी उपस्थिती दर्शवली जाणार असून त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.दरम्यान या सभेनंतर सायंकाळी ४ वाजता उमरगा येथे जाहीर सभा होणार आहे.

मराठवाड्यात 8 जिल्ह्यात 27 तालुक्यात जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास होणार असून 10 दिवसात 27 जाहीर सभा , मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे.दिनांक १७ जानेवारीला सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा,सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ४ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ४ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ४ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता मंठा, २४ जानेवारीला सकाळी ११ वाजता जाफराबाद, दुपारी ३ वाजता घनसावंगी, सायंकाळी ७ वाजता बदनापूर, आणि शेवटची जाहीर सभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांची ३ फेब्रुवारीला औरंगाबादला होणार आहे. या यात्रेमुळे मराठवाड्यातील पक्ष कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related posts

श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

News Desk

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत तसंच बहुजन युवकांचं पालकत्व स्वीकारा !

News Desk