HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

रत्नागिरी | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात. ते कोकण उद्धवस्त करायला निघाले आहेत. मात्र कोकणची जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला ते रत्नागिरी येथे झालेल्या सभेत बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेला नाणार प्रकल्प गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये सोमवारी उपस्थित होते. त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, 3 लाख कोटी, 4 लाख कोटींचे प्रकल्प कोकणाला नकोत. प्रदूषणामुळे कोकण उद्धवस्त होणार आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सातत्याने विरोध केला आहे. मी स्वत: पंतप्रधान, पेट्रोलिय मंत्र्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना ग्रामसभांचे ठराव दिले, मात्र मुख्यमंत्री फक्‍त हसले. फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात ते आता कोकणाला उद्धवस्त करायला निघाले आहेत मात्र शिवसेना कोकण उध्वस्त होऊ देणार नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, वोटिंग मशीनमध्ये बिघाड

News Desk

“टायगर आता काँग्रेसमय झालाय!”, नाना पटोलेंचाही शिवसेनेला टोला

News Desk

तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे, सामनातून संभाजीराजेंना प्रश्न

News Desk
महाराष्ट्र

नाणार जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द | सुभाष देसाई

News Desk

रत्नागिरी | नाणार येथे होणा-या रिफायनरी प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. असे असताना नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नाही. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केली असताना दुसरीकडे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार रिफायनरी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाल्याची घोषणा केली.

रत्नागिरीच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे नाणार प्रकल्पाबाबत नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेने आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची होती.

उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारने शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.

 

 

 

 

 

Related posts

मुख्यमंत्री आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर जाणार

News Desk

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या!

News Desk

‘कोरोना’च्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार !

swarit