HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

रत्नागिरी | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात. ते कोकण उद्धवस्त करायला निघाले आहेत. मात्र कोकणची जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला ते रत्नागिरी येथे झालेल्या सभेत बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेला नाणार प्रकल्प गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये सोमवारी उपस्थित होते. त्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले, 3 लाख कोटी, 4 लाख कोटींचे प्रकल्प कोकणाला नकोत. प्रदूषणामुळे कोकण उद्धवस्त होणार आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाला सातत्याने विरोध केला आहे. मी स्वत: पंतप्रधान, पेट्रोलिय मंत्र्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांना ग्रामसभांचे ठराव दिले, मात्र मुख्यमंत्री फक्‍त हसले. फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात ते आता कोकणाला उद्धवस्त करायला निघाले आहेत मात्र शिवसेना कोकण उध्वस्त होऊ देणार नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केले आहे” – जेपी नड्डा

News Desk

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची राहुल गांधींवर टीका!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna