HW News Marathi
महाराष्ट्र

काकडी लागवडीमुळे शेतकरी झाला कर्जबाजारी

ज्ञानेश्वर काशीद, करमाळा | यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदी होता. उन्हाळ्यात काकडीला चांगला दर मिळेल या आशेने करमाळाच्या घोटी गावातील युवा शेतकरी ज्योतीराम गीते यांनी त्याच्या ३० गुंठे शेतात क्षेत्रात काकडीचीलागवड केली. लागवडीपासून आतापर्यंत त्यांना ५० हजार रूपये खर्च आला आहे.

काकडी लागवडीतून किमान 80 हजार रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र उलट ज्योतीराम गीते यांना बाजारपेठेत काकडीला 2 रुपये काकडीला दर आहे. पण, मजुरी आणि खर्च जास्त असल्यामुळे गीते यांच्या काकडीला योग्य हामीभाव मिळला नाही. त्यामुळे नाईलाजाने ज्योतीराम गीतेंवर जनावरांना काकडी खाऊ घालण्याची वेळ आली आहे. अशीच परस्थिती सर्व शेतमालाची असल्यामुळे बळीराजा मात्र अच्छे दिनापासून कायमचा वंचित राहणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.

‘बाजारात काकडीला योग्यतो भाव न मिळाल्यामुळे मोठे नुकसान तर झाले. काकडी लागवडीने आम्ही कर्ज बाजारी झालो आहोत. नाईलाजाने आम्हाला ही काकडी जनावरांना खाऊ घालावी लागत असल्याचे शेतकरी ज्योतीराम गीते यांच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री पकंजा मुंडेंच्या गावात जलयुक्तमध्ये घोटाळा

News Desk

जाणून घ्या… या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

swarit

‘मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?’, शेलारांनी व्यक्त केली भीती

News Desk