HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफीच्या रकमेसाठी शेतक-यांना दिवाळीची वाट पहावी लागणार

आॅनलाइन’ प्रक्रियेनंतर आता लेखापरीक्षकांमार्फत होणार अर्जांची छाननी

मुंबई शेतक-यांच्या कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेसाठी आॅनलाइन अर्ज मागविल्यानंतर छाननीही संगणकीकृत पद्धतीने केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सहकार विभागाने प्रत्येक अर्जाची प्रत्यक्षातही छाननी करण्यासाठी राज्यभरात सुमारे साडेतीन हजार लेखापरीक्षक तैनात केले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आॅनलाइन पद्धतीने छाननी होत असताना सहकार विभाग ही समांतर दुहेरी प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे अपात्र शेतकरी गैरफायदा घेऊ शकणार नाहीत, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. या अर्जाची छाननी सोमवारपासून माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रक्रियेतून सुरू होईल.

ही छाननी तीन-चार दिवसांत पूर्ण होईल. कर्जमाफीत न बसणारे म्हणजे आमदार-खासदार व अन्य लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, प्राप्तिकरदाते आदींची यादी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे आहे. बँकांनी दिलेला कर्जाचा व महसूल विभागाचा सातबाराचा पूर्ण तपशील छाननी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे. लेखापरीक्षकांनी अर्ज मंजूर केल्यानंतरच शेतकºयांच्या बँक खात्यात सरकारची कर्जमाफी किंवा प्रोत्साहन योजनेची रक्कम जमा होणार आहे. केवळ माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संगणकीकृत छाननीवर अवलंबून राहून योजनेचा लाभ देण्यास सहकार खात्याची तयारी नाही.

कर्जमाफीसाठी सुमारे ५८ लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज आले असून पती-पत्नीच्या नावे असलेल्या स्वतंत्र कर्जाची संख्या लक्षात घेता ही संख्या जास्तीत जास्त ६३ ते ६५ लाखांपर्यंत जाईल. राज्यातील एकूण ८९ लाख कर्जदार शेतक?्यांपैकी या योजनेत अर्ज आलेल्यांची संख्या सुमारे २५ लाखाने कमी असून कर्जमाफीच्या निकषात जास्तीत जास्त १०-१२ लाख शेतकरी बसू शकत नाहीत, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतक?्यांच्या नावे किमान १२-१५ लाख कर्जखाती बोगस काढली गेल्याचा संशय सहकार खात्याला आहे. कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी मध्यरात्री संपली असून आॅनलाइन नोंदणी केलेल्या एक कोटी २० लाख शेतकºयांंपैकी ५८ लाख शेतकरी कुटुंबीयांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

दरम्यान, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी अजार्ची सरसकट संगणकीकृत छाननीच होईल, अशा सूचना काल दिल्या. ज्या शेतकºयांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळतील किंवा ते नाकारले जातील त्यांचीच छाननी लेखापरीक्षकांमार्फत किंवा व्यक्तिश: केली जाईल. योजनेत आलेल्या ५८ लाख अर्जाची लेखापरीक्षकांकडून सरसकट छाननी होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मूर्ती विमानतळासाठी सर्व परवानग्या तीन महिन्यात मिळवा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

माझं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही – प्रताप सरनाईक

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला!

News Desk