HW News Marathi
महाराष्ट्र

भुसावळमध्ये गोळीबार, भाजपच्या नगरसेवकासह ४ जणांचा मृत्यू

जळगाव | भुसावळमध्ये भाजपचा नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात खरात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू आहे. या घटनेने संपूर्ण भुसावळमध्ये एकच खळबळ माजली आहे. या हत्याकांडातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, ही घटना रविवारी (६ ऑक्टोबर) रात्री पावणे दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी खरात यांच्या घराच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. त्यामुळे खरात यांच्या कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली.

रवींद्र खरात हे त्यांच्या आंबेडकर नगर परिसरातील घरात बसले असताना मोटार सायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. या चौघांनी चाकू, दगड, विटा यांच्या सहाय्याने खरात कुटुंबावर हल्ला केला. यावेळी खरात परिवारातून प्रतिकार वाढल्याने मोटार सायकलवर आलेल्या एका आरोपीने आपल्यासोबत आणलेल्या बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाले होते.

या घटनेत तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर रवींद्र खरात (५०) यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने भुसावळसह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नगरसेवक रवींद्र खरात त्यांचे बंधू सुनील खरात (५५), मुलगा प्रेमसागर आणि रोहित खरात (२४) आणि त्यांचा मित्र सुमित गजरे या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांना हाथरसप्रकरणी दु:ख झाले असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं- नवाब मलिक

News Desk

राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर…रोहित पवारांचे चिराग पासवान यांना पत्र 

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

News Desk