HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: मी ‘त्या’ विधानावर ठाम, अजून काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही !

पुणे | “२०१४ ला शिवसेनेने काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यावर मी ठाम असून त्यावर अजून काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,” असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, “नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आमचा कडाडून विरोध आहे करत आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने या कायद्याला विरोध करत आहे. या कायद्याविरोधात देशभरात निषेर्धात सुरू आहे. या कायद्याविरोधात देशात पहिल्यांदाच तरुण, महिला, शेतकरी, दलित आणि अल्पसंख्याक रस्त्यावर उतरले आहे. देशात खूप व्यपक असे नाराजीचे वातावरण कारण संविधानाच्या मुळ ढाच्यावर केलेला हल्ला आहे. त्यामुळे आमच्या सर्वांचा या कायद्याला विरोध असल्याचे मत,” चव्हाणींनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे.

“वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येत्या शुक्रवारी (२४ जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या जे भूमिका घेईल, असेही चव्हाण एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. थेट ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड होयची ती ठाकरे सरकारने बंद केल्याचा होत आहे, असा सवाल चव्हाणांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात प्रशासकीय यंत्रणा कोलमडून टाकण्यात आली. सर्व नियम धाब्यावर ठेवून आपल्या लाडक्या अधिकाऱ्यांना पाच पाच वर्षे एका ठिकाणी ठेवणे, या गोष्टी झाल्यात यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे चव्हाण एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम महाराष्ट्राचा नेता हरपला

News Desk

आर्यन खान प्रकरणी चौकशीचे अधिकार काढल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 3700 कोटी जमा होणार विजय वडेट्टीवार यांची माहिती

News Desk