HW News Marathi
महाराष्ट्र

चार महिन्यात चार डीजी निवृत्ती होणार

मुंबई | येत्या चार महिन्यात पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. ३१ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई पोलीस दलाचे आयुक्त दत्ता पडसलगीकरांसह अन्य चार महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती होत आहे. यामध्ये राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर सह पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाचे व्ही.डी. मिश्रा याच्या नावाचाही समावेश आहे.

राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर यांची सेवानिवृत्ती ३० जूनला होणार असून त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात म्हणजेच ३१ ऑगस्ट ला मुंबई पोलीस दलाचे प्रमुख दत्ता पडसलगीकर यांची सेवानिवृत्तील होण्याची शक्यता आहे.

  • या अधिकाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता…

महावितरणचे सुरक्षा संचालक सुरेंद्र पांडे,नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम, नवी मुंबईचे आयुक्त हेमंत नागराळे आणि ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग हे सेवाजेष्ट्यतेनुसार पात्र ठरतात.

३० जूनला राज्य पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर यांची निवृत्ती झाल्यावर त्या ठिकाणी मुंबई पोलिस दलाचे आयुक्त दत्ता पडसलीगर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे पण त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तपदी सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवरील सुबोध जैस्वाल यांची नियुक्ती झाल्यास हे शक्य आहे. जैस्वाल राज्यात परत न आल्यास त्याठिकाणी सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे आणि ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांची वर्णी लागू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार!

News Desk

“रात्री कोणाला अटक झाली तर…”, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

News Desk

दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना ‘मनसे’ टोला!

News Desk
व्हिडीओ

केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, परंतु काळजी घेणे अवश्य

News Desk

डॉक्टर म्हणजे देव असे म्हटले जाते. मृत्यूच्या दारातून रुग्णाची सुटका ते करतात. कधी कधी रुग्णासाठी ते अनेक गोष्टींचा त्याग करतात आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण करतात. केरळमध्ये अशीच एक घटना घडली. केरळच्या कोझिकोड येथे निपाह व्हायरस पीडित रुग्णांची सेवा करताना नर्स लिनी यांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे आपले कर्तव्य पार पाडताना तिला आपल्या कुटुंबियांना भेटता आले नाही. तिने कुटुंबावरील प्रेमाखातर त्यांना भेटण्याचा मोह आवरला अन्‌ शेवटी कर्तव्य बजावत असतानाच तिने आपले प्राण सोडले.

निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत १० जणांना जीव गमवावा लागला, तर आणखी २५ जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचे निष्पन्न झाले. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो,असे केरळ आरोग्य विभागाने राज्यभर हाय अलर्ट म्हणून घोषित केलं आहे. या व्हायरसने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेक जणांवर उपचारहि सुरू आहेत . चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नसल्याची शक्यता सध्या दर्शविली आहे.आता हा ‘निपाह’ विषाणू म्हणजे काय?

१. निपाह व्हायरस (NiV) हा वेगाने पसरतो, जो जनावरं आणि मानवावर वेगाने हल्ला करून गंभीर आजाराला जन्म देतो.

२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, 1998 मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता ३. सुरुवातीला डुकरांना लागण झाली आणि नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये हा विषाणू पसरला 4. बांग्लादेश आणि मलेशियात या विषाणूचे प्रमाण जास्त

दरम्यान, सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी केरळला डॉक्टरांचे पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळे खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणेही गरजेचे आहे.

 

Related posts

Balasaheb Thackeray यांनी दिलेले ‘संकेत’ खरे ठरणार?

Manasi Devkar

Chatrapati Sambhaji Nagar जवळील ओहर गावात दोन गटात वाद; परिस्थिती नियंत्रणात

Chetan Kirdat

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk