HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल प्रसन्न म्हणूनच…!

मुंबई | “आमच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल प्रसन्न आहे. त्यामुळेच सर्व प्रश्न सुटत आहेत. थोडा उशीर नक्कीच होतोय. मात्र, प्रत्येक प्रश्न परिपूर्णतेने सोडवला जात आहे”, असे विधान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा समाजाला आरक्षणप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर शुक्रवारी (१२ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास मराठा आरक्षणाला स्थगिती न देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, गिरीश महाजन यावेळी बोलत होते. “गेल्या वर्षी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याशिवाय मी पंढरपूरला येणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतरच ते पंढरपूरला गेले. सर्वोच्च न्यायालयाने देखील आता मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आमच्याकडे निष्णात वकिलांची फौज असल्याने मराठा आरक्षणाच्या मार्गात कोणताही कायदेविषयक अडथळा येणारच नाही”, असा ठाम विश्वास देखील गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न 

News Desk

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk

राज्यसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली?

News Desk