HW News Marathi
महाराष्ट्र

खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिली आनंदाची बातमी

मुंबई | भारतात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. भारतात सध्या १५०० च्या वर कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे, तर महाराष्ट्रात ३०० च्या पुढे हा आकडा पोहोचला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या आधीपासूनच अनेक खासगी कर्मचाऱ्यांना वर्ग फ्रॉम होमचा पर्याय निवडण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आणि सगळ्यांच कंपन्यांनील कर्मचारी घरी बसले. याचा कंपनीवर आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आर्थिक घडामोडीत होणारे चढउतार लक्षात घेता कुठल्यागी कर्मचाऱ्याच्या पगारात कपात करु नये, असे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी सांगितले होते, आता या संदर्भातील शासकीय निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

‘कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव – लॉकडाऊन कालावधीत बेघर/ विस्थापित कामगार व परराज्यातील अडकलेले कामगार यांच्या वेतनात अथवा मजुरीत कोणतीही कपात करु नये. तसेच, त्यांना कामावरुन कमीही करु नये,’ असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्यांनील कर्मचाऱ्यांना घाबरुन जाण्याचे कारण नाही. शासनाच्या आदेशानुसार, सर्व खासगी कंपनी, कारखाने, कंपन्या, दुकाने, इत्यादी आस्थापनांचे सर्व कामगार, तात्पुरत्या कालावधीचे कामगार व कर्मचारी ज्यांना, कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे घरी बसावे लागत आहे, त्यामूळे त्यांना संपूर्ण वेतन व भत्ते देण्यात यावे, असे या आदेशात म्हटले आहे. राज्य सरकारचा हा आदेश, महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यीक, व्यापारी व दुकाने यांना लागू असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवसाढवळ्या भररस्त्यात खून झाल्याने बीड शहरात खळबळ

News Desk

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, सामनातून मोदींना सवाल

News Desk

पाण्यावर तरंगणारा दगड मालवणात सापडला

News Desk