HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत

गडचिरोली | जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या १६ पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. तसेच शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकारचीच असल्याचे मुनगुंटीवार यांनी सांगितले आहे.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-६० हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १६ जवान शहीद झाले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने जमा केला जाणार असून जवानांना कॅडरनुसार घरेही दिले जाईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तडजोड केलेली नाही, भाजपची अडचण समजून घेतलीय !

News Desk

आरेतील मेट्रो कारशेडला विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे

News Desk

जिवंत बाळाला केले मृत घोषित, जालना जिल्हातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा

News Desk