HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत

गडचिरोली | जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या १६ पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. तसेच शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकारचीच असल्याचे मुनगुंटीवार यांनी सांगितले आहे.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-६० हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १६ जवान शहीद झाले. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने जमा केला जाणार असून जवानांना कॅडरनुसार घरेही दिले जाईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RTI: माहिती अधिकारातून मिळालेली माहिती सत्यचं असेल असं नाही, सुप्रीम कोर्ट

News Desk

नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांनी मंत्रालयात जावून घेतली उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

Aprna

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती

Aprna