HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांनी सांगितला यशाचा मूलमंत्र

मुंबई सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांनी आज (२९ नोव्हेंबर) यशाचा मूलमंत्र दिला.

पुणे येथील सुपरमाईंड फाउंडेशन या संस्थेने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत‘ या विषयावर एका दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे. या विपरीत परिस्थितीत विज्ञान व गणित यांसारखे कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना राज्यपालांनी शिक्षकांना केली.

विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक व पालकांना करावे लागेल !

आजचे विद्यार्थी विद्यार्थी तंत्रज्ञान-स्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करीत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गदत्त बुद्धिमत्ता असते, या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक व पालकांना करावे लागेल, असे राज्यपालांनी संगितले.

कोरोनावर लस येण्यासाठी काही काळ जाणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत अशांपर्यंत देखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार राष्ट्रपतींची भेट घेणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

News Desk

गृहराजमंत्री शंभूराज देसाई जेव्हा उदयनराजेंना मुजरा करतात तेव्हा …!

News Desk

बारामतीत होम कॉरंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवर हल्ला

swarit