HW News Marathi
महाराष्ट्र

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली | कांदा निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने एक चांगली बातमी दिली आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवरील अनुदान ५ टक्क्यांवरुन १० टक्के करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. शेतकऱ्यांना प्रति किलो कांद्यामागे अवघे १ ते २ रुपये इतकाच दर मिळत होता. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कांद्यामागे २०० रुपये इतके अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

नाशिकच्या संजय साठे यांनी तब्बल ७५० किलो कांदा विकून कमविलेले एकूण १ हजार ६४ रुपये पंतप्रधान मोदींना पाठविले होते. त्यानंतर पीएमओकडून देखील याची दखल घेतली गेली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…! 

News Desk

नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर

News Desk

आता कोरोनाच्या भितीला झुगारून काम करावे लागेल, रोहित पवारांचे युवकांना आवाहन

News Desk
क्राइम

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk

अकोला : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर बलात्कार करणाऱ्या पोलिसावर जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्यासंदीप आनंद गवई या ४२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानेसंबंधित १५ वर्षीय मुलीवर ऑक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बलात्कार केले. रविवारी पीडितेने याची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.

संदीप गवई याने २०१६ च्या दसऱ्याच्या दिवशीतिला घरी बोलावले व मोबाइल नंबर दिला. ‘मला नेहमी फोन करीत राहा. तू फोन केला नाहीस, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन,’ अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे. दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहूनतिला बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायचे,तेव्हा आरोपी पाठलाग करायचा व जवळीक करण्याचा प्रयत्न करायचा; मात्र त्याला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, ४ जुलैच्या रात्री आरोपीने आई घरी असताना हाका मारल्या. आईने विचारणा केली असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाणे गाठले असेही पीडितेने म्हटले आहे.

Related posts

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!

News Desk

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk

भंगारवाला ते करोडपती

News Desk