HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणात राहणार, निवडणूक लढणार नाही !

मुंबई | “या पुढे निवडणूक लढविणार नाही. पण राजकारणातून सन्यास घेणार नाही,” अशी घोषणा बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी आज (२२ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक न लढण्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात काल (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. आता सर्वांचे २४ ऑक्टोबरला येणाऱ्या निकालाची लागली आहे. हितेंद्र ठाकूर स्वत: वसईतून निवडणुकीच्या रंगणात उरले आहेत तर नालासोपारा येथे शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्यासमोर कडवी झुंज देत आहेत.

यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे मुद्दे नसतील तर दहशतीचे आरोप करतात, वसई-विरारमध्ये सर्व लोके एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. त्यात असे कोणीही उपरे येतात आणि दहशतीचा आरोप करतात. अतिशय गंभीर आरोप केले गेले. मला आता तालुक्याची बदनामी नको, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. मी शिवसेनेबरोबर कधीच नव्हतो. १२४ जागांवर निवडणूक लढवणारा कधी सत्तेत बसू शकतो का? असा सवालच हितेंद्र ठाकूर यांनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझ्या कुटुंबीयांचं काश्मीरशी नातं’ काँग्रेस नेते राहुल गांधीचं वक्तव्य!

News Desk

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk

साखर कारखान्याच्या अध्यक्षांची गोळी झाडून आत्महत्या

News Desk