HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई | राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाची धग राज्यात अद्याप कायम आहे. आरक्षण मिळाल्या शिवाय आपण शांत बसणार नसल्याची भूमिका सध्या मराठा आंदोलकांनी घेतलेली पहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.

या आरक्षणाबाबत सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात 14 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, ही सुनावणी लवकर घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली होती. त्यामुळे ही सुनावणी सात दिवस आधी घेतली जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. याशिवाय आंदोलना दरम्यान आठ तरुणांनी आत्महत्यादेखील केल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांकडून सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्याच विनंती वरुन आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गरोदर महिला आणि डायलिसीसच्या रुग्णांच्या प्रश्नावर फडणवीसांची सरकारला विनंती

News Desk

Raju Shetty HW Exclusive : लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर अफवांसाठी नव्हे तर …!

News Desk

धनंजय मुंडेच्या टीकेला बहीण प्रीतम मुंडेंच सडेतोड प्रतिउत्तर!

Aprna
देश / विदेश

स्वातंत्र्य दिनी हजर रहा, सरकारी बाबूंना आदेश

News Desk

नवी दिल्ली | अवघ्या काही दिवसांवर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा, असा आदेश दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सरकारचे सर्व मंत्री, महत्त्वाचे राजकीय नेते, राजदूत, उच्चायुक्त उपस्थित असतात. पुढील स्वातंत्र्य दिनाआधी देशात सार्वत्रिक निवडणुका होत असल्यानं मोदी सरकारसाठी हा स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य दिनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व विभागांना १ ऑगस्ट रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. कॅबिनेट सचिवांकडून या सूचना देण्यात आल्या असून त्यामधून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान देशाला संबोधित करत असल्यानं हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सोहळ्यास उपस्थित राहावे,’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी पाचव्यांदा देशातील नागरीकांना लाल किल्ल्यावरुन संबोधित करणार आहेत. त्यामुळे हा दिवस प्रचंड महत्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाला उपस्थित न राहणा-या सर्व सरकारी बाबुंची गंभीर दखल घेतली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

Related posts

केरळमधील मुसळधार पावसामुळे ७९ पेक्षा अधिक जणांचा बळी

swarit

एकाच दिवसात तीन वेळा पाकच्या ‘नापाक’ कारवाया

News Desk

पेटत्या चितेतून बाहेर काढला महिलेचा मृतदेह

News Desk