HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, ३० हून अधिक नागरिक बेपत्ता

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. याच दरम्यान किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात ढगफुटी झाल्याचं समजत आहे. परिसरात मदतकार्य आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

३० हून अधिक लोक बेपत्ता

किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पहाटे पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत ३० हून अधिक लोक पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बेपत्ता आहेत. अनेक घरांचंही यामुळे नुकसान झालं आहे. पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवार जिल्ह्यातील दाछिन परिसरातील होन्जार गावात ढगफुटी झाली. त्यानंतर ३० ते ४० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आमच्याकडे अद्याप अचूक माहिती नाही तसेत येथे मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी नसल्याचं समजतंय.

किश्तवाड जिल्हा पोलिस प्रमुख एसएसपी शफकत भट यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा गावात ३० ते ४० लोक होते. किश्तवाड़ शहर जम्मूपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे आणि दाछिन हे किश्तवार जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ परिसरात आहे.

पावसाचा जोर कायम

जम्मू-काश्मीर मध्ये पावसाचा जोर अद्यापही कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून जम्मूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जुलैच्या अखेरीस जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने किश्तवार अधिकाऱ्यांनी पाण्याच्या साठ्यांजवळ आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्री जारी केलेल्या निवेदनात जिल्हा प्रशासनाने सांगितले की, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून त्यामुळे नद्या व नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकेल आणि त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होईल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद

News Desk

नवे मंत्री आज आपल्या पदाचा कारभार हाती घेणार; पंतप्रधानांनी बोलावली बैठक

Jui Jadhav

कर्नाटकातील आमदारांचा गोव्याला जाण्याचा प्लॅन रद्द

News Desk