HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीच्या काळात २ जैन मंदिरे खुली करण्यास उच्च न्यायालाने दिली परवानगी

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे बंद आहेत. मंदिरे पुन्हा सुरु करण्यासाठी मागणी केली जात आहे. अशात दिवाळीच्या काळात मुंबईतील दोन जैन मंदिरे उघडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दादर आणि भायखळ्यातील जैन मंदिरांचे दरवाजे उघडणार आहेत. धनत्रयोदशी आणि भाऊबीजे दरम्यानच्या पाच दिवसांसाठी ही मंदिर खुली ठेवण्याची परवागनी उच्च न्यायालयाने दिली आली आहे. सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जैन मंदिरे खुली राहतील. मात्र, १५ मिनिटांच्या कालावधीत मंदिरात फक्त १३ लोकंच सोडले गेले पाहिजेत, असा दंडक न्यायालयाने घालून दिला आहे. मात्र, मुंबई आणि लगतच्या परिसरातील इतर १०० मंदिरे खुली करण्याची विनंती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही पर्यूषण पर्वाच्या काळात जैन समाजाकडून मंदिरे सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, तेव्हा राज्य सरकारने या मागणीसाठी नकार दर्शविला होता. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील इतर प्रार्थनास्थळांसाठीही हाच न्याय लावला जाणार का, हे पाहावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने अनलॉक मोहिमेतंर्गत हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा दिली असताना मंदिरे का सुरु केली जात नाहीत, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवसैनिकांचे आमरण उपोषण

Gauri Tilekar

“स्वत: घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचं?”, मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

१५ कोटी ७५ लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन भाजप आमदारासह १६ जणांवर गुन्हा दाखल

News Desk