HW News Marathi
महाराष्ट्र

१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | पहाटेपासून मुंबईसह उपनगर, ठाणे, भिंवडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईची लाईफलाईनवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. १२ जून पर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

मुंबई उपनगरामध्ये रात्रभरात सर्वाधिक पाऊस मुलुंड, भांडुप भागात झाल्याची नोंद आहे. याशिवाय कांजूरमार्ग, पवई, अंधेरी, वांद्रे परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले. ५० ते ६० घरात पावसाचे पाणी शिरले. जैतुनपुरा भागात इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला असून भिंवडीत वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिरजमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन

Gauri Tilekar

“नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार” – अशोक चव्हाण  

News Desk

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांची केली  पायमल्ली!

News Desk