HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतले, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई | भीमा-कोरेगाव प्रकरणातील ६४९ गुन्ह्यापैंकी ३४८ गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली आहे. मात्र, या प्रकरणातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे अद्याप मागे नसल्याची माहिती गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले. देशमुख पुढे म्हणाले की, ” मराठा आरक्षणातील आंदोलनदरम्यान ५४८ गुन्ह्यांपैकी ४६० गुन्हे मागे घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहात दिली आहेत. तसेच नाणार प्रकल्पादरम्यान दाखल झालेल्या ५ गुन्ह्यापैकी ३ गुन्हे मागे घेण्यात आले, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील हे गुन्हे किरकोळ स्वरुपाचे आहेत. मात्र, सार्वजनिक मालमत्तेचे करण्यात आलेले नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणावर मराठा सामाजाने मुख मोर्चानंतर ठोक मोर्चा काढला होता. या ठोक मोर्चात अनेक मराठा आंदोलकांनी सर्वाजनिक मालमत्तेचे नुकसात देखील केले होते. मराठा आंदोलनकांवरील गुन्हेही मागे घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय द्यावा लागला असता

News Desk

राज्यात परतीच्या पावसाने घातला धुमाकूळ! हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी 

News Desk

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, मुख्यमंत्र्यांची मागणी 

News Desk