HW News Marathi
महाराष्ट्र

“एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले”, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

मुंबई | १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे.अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तर, न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी पदापासून दूर होत आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.

‘अनिल देशमुख साहेबांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रीमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणुन आबानंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपाच्या सुडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला, हे वेदनादायी, ‘असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून केली होती. अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अशीच मागणी केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही मागणी मान्य करत न्यायालयानं सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्यांचे आधारवड व्हा; पोलीस दलाची शान वाढवा! – अजित पवार

Aprna

ऑक्सिजनअभावी मृत्यू न झाल्याचं ठाकरे सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, भाजपचा राऊतांना टोला

News Desk

लवादाच्या बाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावे, पंकजा मुंडेंचा सल्ला!

News Desk