HW News Marathi
महाराष्ट्र

गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचार बंदी ३१ मार्चपर्यंत लागू केली आहे. तसेच, नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन करुनही काही लोक घरातून बाहेर पडत आहेत. पण, असे वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर उतरत असतील तर पोलिसांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (२४ मार्च) एका माध्यमाशी बोलताना दिला. राज्यात लॉकडाउन केल्यानंतरही लोकांनी ऐकले नाही आणि त्यामूळे नाईलाजाने आम्हाला संचार बंदी लागू करावी लागली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ५०० पर्यंत गेली असून महाराष्ट्रात हा आकडा १०७ वर पोहोचला आहे. तसेच राज्यात एकूण ३ जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे तर देशात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर शहरातून लोक गावाकडे रवाना झाले. त्यामूळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तसेच, खूप मोठ्या प्रमाणावर शहरातून लोकं गावात आली आणि गावकऱ्यांना काही संशय आला तर ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी, असेही अनिल देशमुखांनी गावकऱ्यांना सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय”, पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का? राज्यपालांचा पत्रातून प्रश्न

News Desk

महाड येथे काँग्रेसच्या मेळाव्याला सुरुवात

News Desk