HW News Marathi
महाराष्ट्र

राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर…!

मुंबई | “राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर मनसैनिक शांत बसणार नाही. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. कोहिनूर मिल ३ प्रकरणी आज (२२ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्यानंतर मनसैनिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचप्रमाणे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

“सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे. मात्र, राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर मनसैनिक शांत बसणार नाही. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर ‘कृष्णकुंज’ या राज यांच्या निवासस्थानाच्या परिसरासह दक्षिण मुंबईत पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ईडी कार्यालयाच्या परिसरात देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बुधवारी (२१ ऑगस्ट) पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते, समर्थकांना कलम १४९ अन्वये नोटीस जारी करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंचा नाशकात अचानक सिटी बसमधून प्रवास..!

News Desk

‘महिला सुरक्षणासाठी मनसेची धाव गृहमंत्र्यांकडे’ !

News Desk

’19 दिवसात दिले तब्बल 10 कोटी डोस’, देशात लसीकरण वेगाने!

News Desk