HW News Marathi
महाराष्ट्र

ओमायक्रॉनचा धोका वाढल्यास राज्यात लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते! – अजित पवार

मुंबई | राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन आजाराची रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये, तर विवाह सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यात लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, इथून पुढे मी कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, अशा इशारा अजित पवार यांनी दिला. कार्यक्रमाचा ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी किंवा गर्दी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी १ तास आधीच जात असल्याचे त्यांनी साताऱ्यात बोलताना सांगितले.  अजित पवार म्हणाले, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज (३ जानेवारी) १९१ वी जयंती होती. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी नायगावाल गेले होते. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असं होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केली.

रुग्णसंख्या वाढल्यास मिनी लॉकडाऊन लागू शकतो – विजय वडेट्टीवार 

पश्चिम बंगालमध्ये जसा मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र कोरोनाची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रात देखील पश्चिम बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. तशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली, असे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही९ मराठीशी संवाद साधताना दिली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मॉलमध्ये हॉस्पिटल या आधी कधीच पाहिलं नाही,” भांडूपच्या आगीनंतर महापौरांचं वक्तव्य

News Desk

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

News Desk

मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सतत चालढकल का ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

News Desk