HW News Marathi
देश / विदेश

तातडीने स्थलांतर थांबवा, ‘राज्यपालांचे’ सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामूळे नागरिक शहरातून गावाकडे जात आहेत. आज (२८ मार्च) याच स्थलांतराने ७ प्रवाशांच्या जीव धोक्यात अडकला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर या ७ प्रवाशांचा पायी चालत जाताना अपघात झाला. या स्थलांतराच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व विभागीय आयुक्तांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत तातडीने नागरिकांचे स्थलांतर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व ६ विभागीय आयुक्तांशी चर्चा करत कोरोनाचे वाढते संक्रमण आणि त्यामूळे नागरिक करत असलेले स्थलांतर याबद्दल माहिती घेतली. नागरिकांना ते जिथे अयतील तिथेच थांबवण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

औद्योगिक वसाहतींमध्ये उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या नागरिकांनी थांबावे, अशी विनंती करत त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची सोय सरकार करेल असेही यावेळी राज्यपालांनी सांगितले. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील तिथेच थांबण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. राज्यपालांनी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, कोकण व पुणे येथील विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. आता निदान राज्यपालांच्या याआदेशाचे तरी पालन करत नागरिक स्थलांतर थांबवतील का? असा प्रश्न उद्भवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका होते | मोदी

Gauri Tilekar

कठुआ बलात्कार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk