HW News Marathi
Covid-19

आजपासून १ मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू… जाणून घ्या काय सूरू काय बंद!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध १ मेपर्यंत असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे या आधी संकेत दिले होते. आज त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे नवी नियमावली?

  • मुंबई लोकल आणि मेट्रो सामान्य लोकांसाठी बंद, केवळ अत्यावशक सेवेतील लोकांनाच परवानगी
  • मोनो प्रवास पूर्णपणे बंद
  • लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
  • लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम
  • आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
  • जिल्हा बंदीचा निर्णय जाहीर
  • खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
  • सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने
  • खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने
  • बाहेरून येणाऱ्या लोकांना १४ दिवस Quarantine व्हावे लागणार

राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

News Desk

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

News Desk

राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

News Desk