HW News Marathi
Covid-19

एफआयआर दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र, अर्णब गोस्वामींचा दावा

नवी दिल्ली। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दाखल केलेले विविध एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज (११ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. एफआयआर राजकीय षडयंत्र असल्याचा दावा गोस्वामींनी त्यांच्या याचिकेत केला आहे.

मुंबई पोलिसांनी माझ्याबद्दल गैरसमज झाल्याचे देखील त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. गोस्वामी यांनी कठोर कारवाई व एफआयआर रद्द करण्यापासून संरक्षण मागितले आहे, तक्रार दाखल करणाऱ्या मुंबईच्या रझा अकादमीने म्हटले आहे.

लॉकडाऊनच्या काळात वाढ केल्यानंतर रेल्वे सुरु होण्याच्या अफवेमुळे हजारो परप्रांतीय कामगार बांद्रा रेल्वे स्टेशनजवळ जमा झाले होते. यावेळी बातमीत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य गोस्वामीने त्या संदर्भातील बातमीत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य गोस्वामीने केले होते. यामुळे रिपब्लिक टीव्हीवरील यांच्या कार्यक्रमाविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीमुंबईच्या रझा अकादमीने तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, गोस्वामीची एप्रिल महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात या तक्रारीसंदर्भात दोन पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल १२ तास चौकशी केली होती. त्यातीलच एक अधिकारी कोरोनाबाधित निघाल्याचे सर्वोच्च न्यायालयातच उघड झाल्याने खळबळ माजली. रझा अकादमीने गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरित मजुरांना घरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, २३ जणांचा मृत्यू

News Desk

स्थलांतरित मंजुरांना केलेली मदत पाहून स्मृती इराणीकडून सोनू सूदचे कौतुक

News Desk

कोरोना लसीकरणासाठी पुणे सज्ज, असा असेल पुण्यातील लसीकरणाचा मास्टरप्लॅन

News Desk