HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील ‘त्या’ चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

बीड | काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील वाळू माफिया पांडुरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ आणि अर्जुन कोळेकर (सर्व रा. तांदळवाडी ता. बीड) या चौघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ते अनेक दिवसांपासून सिंदफना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करत होते. हे चारही आरोपी सध्या फरार असून गेवराई पोलिसांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार लक्ष्मण पवार यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. तर माध्यमांशी बोलतांना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा दोषींवर कार्यवाही करण्यात येईल असे अश्वासन ही दिले होते, तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या घटनेतील दोषींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प – नाना पटोले

News Desk

“राज्यात सध्या कोणतेही निर्बंध आणि लॉकडाऊन नाही”, राजेश टोपे

News Desk

रमेश देव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk