HW News Marathi
महाराष्ट्र

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

किनवट | मराठवाडा म्हटले की डोळ्यापुढे येते ते दुष्काळाचे भयाण दृश्य, ओस पडलेल्या जमिनी आणि कोरड्या पडलेल्या नद्या. नांदेड जिल्यातील किनवट ची पैनगंगा नदी आज जवळपास ३ वर्षांनंतर दुथंडी भरून वाहत आहे. त्यामुळे परीसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जुगादजवळ वर्धा नदीला मिळते. हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो.

कयाधू अरुणावती अडाण, वाघाडी, पूस आदी पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस अधिक महत्त्व असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले आहे. त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका केली?

News Desk

अमृता फडणवीसांचे टिकाकरांना सडेतोड उत्तर…! म्हणाल्या…

News Desk

शिवसेनेनं काँग्रेसचे मन परिवर्तन करावं, चंद्रकांत पाटलांचा सेनेला सल्ला 

News Desk
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती 

swarit

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र परिवाहन मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाचे मंत्री दिवाकर रावते यांनी या योजनेची घोषणा केली. या योजने अंतर्गत १ लाख ४ हजार एसटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मुलं उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

एसटी कर्मचायांच्या दोन पाल्याना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्याने उच्च शिक्षणसाठी महाविद्यलायत प्रवेश घेतल्यानंतर ७५० रुपये दरमहा शिष्यवृत्ती त्याना मिळणार आहे. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांचा राष्ट्रयीकृत बँकेच्या खात्यात जमा होणार आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पाल्याची माहिती गोळा करून त्याची छाननी करून, विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

Related posts

“ही केमिकल लोचाची केस,” उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Aprna

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा, पक्षाने स्थापन केली उच्चस्तरीय समिती

News Desk

“सरकार वाझेंना का पाठिशी घालतंय?”, फडणवीसांचा सवाल  

News Desk