HW News Marathi
महाराष्ट्र

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

किनवट | मराठवाडा म्हटले की डोळ्यापुढे येते ते दुष्काळाचे भयाण दृश्य, ओस पडलेल्या जमिनी आणि कोरड्या पडलेल्या नद्या. नांदेड जिल्यातील किनवट ची पैनगंगा नदी आज जवळपास ३ वर्षांनंतर दुथंडी भरून वाहत आहे. त्यामुळे परीसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जुगादजवळ वर्धा नदीला मिळते. हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो.

कयाधू अरुणावती अडाण, वाघाडी, पूस आदी पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस अधिक महत्त्व असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले आहे. त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर आज होणार सर्वोच्च न्यायालयात फैसला

News Desk

बेळगाव सीमाप्रश्नावर कर्नाटक-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी !

News Desk

अन्यथा आंदोलन तीव्र करु…मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सरकारला इशारा!

News Desk