HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

मुंबई: येत्या काही तासांत राज्यभरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, बीड, जालना, अकोलासह इतर जिल्ह्यात हलक्या सरींना सुरूवात झाली आहे. दरम्यान वेगवेगळ्या घटनेत वीज पडून आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. बिड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चादरी येथे वीज ज पडून पाच जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत.

तर माजलगाव येथे शेतात झाडाच्या आडोशाला थांबलेल्या राधाबाई दामोदर कोळसे यांचावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामेश्वर दशरथ शेरे (वय 34 रा. करजखेडा, ता.पैठण) असे मृताचे नाव आहे. धोपटेश्वोर गावात शेतामध्ये वीज पडून चंद्रभागा विष्णू दाभाडे (वय 52 वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रानात मेंढ्या चारण्यास गेलेला मेंढपाळ व त्याच्या मेढ्यांच्या कळपातील सात मेंढ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना बारामती औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या गाडीखेल गावाच्या शिवारात घडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील आरोग्य विभाग पूर्णपणे सक्षम, मोठ्या प्रमाणात बेड्सची उपलब्धता !

News Desk

बीड नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे वर्चस्व!

Aprna

“माझ्यावरील घोटाळ्याचे आरोप म्हणजे ठाकरे सरकारवरचे आरोप”, प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण

News Desk