HW News Marathi
महाराष्ट्र

बीडच्या सोनेसांगवी सुर्डी गावात जागेच्या वादावरून अंत्यविधी रोखला

बीड | बीडच्या केज तालुक्यातील सोनेसांगवी सुर्डी गावात जागेच्या वादावरून मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचे प्रकार, वारंवार घडत असल्याचे समोर आले. तर आज पुन्हा एक अंत्यविधी रोखण्यात आलाय. गावातील अंबुबाई काशिनाथ साखरे वय ७५ या महिलेचा काल (२६ एप्रिल) वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तर अंबुबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी, गावालगतच्या रिकाम्या शासकीय जागेत. अंत्यविधीचे साहित्य घेऊन गेले असता, त्या ठिकाणी राहणाऱ्या शेजारील शेतकऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला असून अंत्यविधी करू देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे २४ तासांपासून अंत्यविधी रखडला आहे.

गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या पूर्वी ४ जानेवारी रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या ६५ वर्षीय मातंग समाजातील महिलेचे निधन झाले होते. तिचा अंत्यविधीही काही लोकांनी रोखल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी ५ जानेवारीला लक्ष्मीबाई कसबे यांचा मृतदेह ट्रॅक्टरमधून आणून केज तहसीलच्या आवारात ठेवला होता. त्यानंतर तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी ग्रामस्थ व मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली व अंत्यविधी केला होता. यानतर नंदूबाई नामदेव थोरात वय ५० या मातंग समाजातील महिलेचे ११ एप्रिल रोजी निधन झाले. तिचाही अंत्यविधी रोखला गेला होता. तर काल अंबुबाई साखरे यांचा देखील अंत्यविधी रोखला असून अद्याप अंत्यविधी झाला नाही. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

काय आहे प्रकरण ?

गावातील गायरान शेतामध्ये मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने, गावातील मागासवर्गीय समाजातील नागरिक, समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी गावालगत असणाऱ्या शासकीय जागेत करत होते. या अगोदर शासकीय जागेत दोन अंत्यविधी करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अंत्यविधी करून दिला जात नाही. आतापर्यंत या शासकीय जागेत अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या 3 महिलांचा अंत्यविधी रोखण्यात आलेला आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या शासकीय जागेच्या लगत काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागासवर्गीय समाजातील व्यक्तींनी आता गायरानातील स्मशानभूमीत अंत्यविधी करावा. आम्ही इथं अंत्यविधी करू देणार नाहीत, असे म्हणत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी होणारा अंत्यविधी रोखला आहे. तर गायरानातील स्मशानभूमी खूप लांब आहे. आता आम्ही त्या ठिकाणी अंत्यविधी करणार नाहीत. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या सर्व शासकीय जागेत अंत्यविधी करत आहोत. त्यामुळे आम्हाला याचठिकानी अंत्यविधी करू द्या,  अशी मागणी मागासवर्गीय समाजातील काही लोकांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा निवडणुक मनसेसाठी प्रतिष्ठेची

News Desk

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार – उदय सामंत

News Desk

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी – अनिल देशमुख

News Desk